Tuesday, May 5, 2009

२९

कोणाचें हें घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥ १ ॥

मी तूं हा विचार विवेक शोधावा । गोविंदा माधवा याच देहीं ॥ २ ॥

देहीं ध्याता ध्यान त्रिपुटीवेगळा । सहस्र दळीं उगवला सूर्य जैसा ॥ ३ ॥

ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नावें रूपें तुम्ही जाणा ॥ ४ ॥

॥ इति श्रीज्ञानदेव हरिपाठ समाप्त ॥

२८

अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥ १ ॥

नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥ २ ॥

असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मन । उल्हासें करून स्मरण जीवी ॥ ३ ॥

अंतकाळीं तैसा संकटाचें वेळीं । हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥ ४ ॥

संतसज्जनानीं घेतली प्रचीती । आळशी मंदमती केवीं तरें ॥ ५ ॥

श्रीगुरु निव्‍इत्ति वचन प्रेमळ । तोश्हला तात्काळ ज्ञानदेव ॥ ६ ॥



हरीच्या नामाचें यथार्थ कीर्तन हें सोपें साधन आहे. या योगानें अनेक जन्मातून केलेली सर्व पातकें जळून जातात. ॥ १ ॥ हें करीत असतां वनामध्यें जाण्याचे कष्ट करण्याची कांही जरून नाही. नारायण आनंदानें आपल्या घरीं येतो. ॥ २ ॥ जागच्याजागी बसून आपलें चित्त आपण एकाग्र करावें आणि मोठ्या प्रेमानें अनंताचें भजन करावें. ॥ ३ ॥ रामकृष्ण हरि विठ्ठल केशव हा मंत्र नेहमीं जपावा. ॥ ४ ॥ यावांचून हरीची प्राप्ति करून देणारें असें दुसरें साधन नाहीं, असें मी विठोबाची शपथ वाहून सांगतो. ॥ ५ ॥ तुकाराम महाराज म्हणतात सर्व साधनापेक्षां हरीचें नाम हें सोपें साधन आहे. जो कोणी शहाणा आहे तो या साधनांतच तृप्ति पावतो. ॥ ६ ॥

२७

सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ १ ॥

लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरीविण ॥ २ ॥

नाममंत्र जप कोटी जा{ई}ल पाप । रामक्‍इश्ह्णीं संकल्प धरूनी राहे ॥ ३ ॥

निजव्‍इत्ति हे काढी माया तोडी । इंद्रियांसवडी लपूं नको ॥ ४ ॥

तीर्थीं व्रतीं भाव धरीं रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करीं ॥ ५ ॥



साही शास्त्रांनी हरीच्या नामांत सर्व सुखमाधुर्य आहे असें निवडून ठवविलें आहे. (देह हा सादर पहावा निश्चित । सर्व सुख येथें नाम आहे) त्याचें नेहमीं तूं सेवन कर, अर्ध घटका देखील रिकामा राहूं नको. ॥ १ ॥ कारण देहादिक संसार व त्यातील व्यवहार सर्व खोटा आहे, म्हणून हरीला सोडून या संसाराच्या मोहांत राहशील तर तुझी जन्म-मरणाची येरझार व्यर्थ होईल. ॥ २ ॥ म्हणून हरिनाममंत्राचा तूं निरंतर जप करीत जा, या योगानें तुझ्या अनंत पापांचा नाश होईल, याकरितां रामकृष्णनाम घेण्याविषयींचा निश्चय तूं आपल्या मनाशी पक्का करून रहा. ॥ ३ ॥ गुरूजवळ श्रवण, मनन व निदिध्यासनाचा अभ्यास करून तिन्ही देहांतून व तिन्ही गुणाहून वेगळा जो आत्मा तो मी आहे अशी वृत्ति उत्पन्न कर व त्या योगानें सर्व मायाजाळाचा नाश कर. इंद्रियांच्या तादात्म्यात लपून बसू नको. ॥ ४ ॥ तीर्थव्रतांच्या ठिकाणी तू विश्वास ठेव व नेहमीं दया बाळग; कारण जेथें शांति दया असतात तेथें देवाची वस्ती असते, म्हणून तूं आपल्या हृदयांत शांति दया ठेवून तेथें श्रीहरि वस्तीला येईल असें कर. ॥ ५ ॥ हरिपाठ हा समाधीसंजीवन आहे, म्हणजे त्यास जिवंत करणारा आहे, अर्थात् हरिनामाचे ठिकाणी स्थिर होणें, हेच आत्मस्वरूपाचे ठिकाणी जागृत असणें होय, कारण हरिनाम व नामी परमात्मा हा दोन्हींचा अभेद आहे.

परी आश्रय आकाशा । आकाशचि कां जैसा ।

या नामा नामी आश्रय तैसा । अभेद असे ॥ ज्ञानेश्वरी १७.४०३

ज्याप्रमाणें आकाशाला आश्रय आकाशाचा आहे, त्याप्रमाणें नामाला आश्रय तो नामी परमात्मा असल्यामुळें त्या परस्परात अभेदच आहे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत असणें हेंच खरे जिवंत असणें होय. असले जिवंतपण हरिनामाच्या ठिकाणी स्थिर असलें म्हणजे मिळतें. असें ज्ञान मला श्रीनिवृत्तिनाथापासून मिळालें व मला अनुभवानें ते खरें आहे असें पूर्ण कळले, असे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

२६

एक तत्त्व नाम द्‍इढ धरीं मना । हरीसी करुणा ये{ई}ल तुझी ॥ १ ॥

तें नाम सोपें रे रामक्‍इश्ह्ण गोविंद । वाचेसी सद्‍गद जपे आधीं ॥ २ ॥

नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणि पंथा जाशी झणी ॥ ३ ॥

ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥ ४ ॥



हरीचें नाम हेंच तत्त्व आपल्या मनामध्यें बळकट धरा, म्हणजे एकट्या हरिनामाचें मनानें सारखें चिंतन करीत रहा, त्या योगानें हरीला तुझी दया येईल. ॥ १ ॥ राम कृष्ण गोविंद हें नाम सोपे आहे, म्हणून अगोदर तें प्रेमानें घे. ॥ २ ॥ हरीच्या नामाखेरीज जीवाला संसारातून सोडविण्यास दुसरें साधन नाहीं. तूं दुसऱ्या साधनांकडे जाशील तर फसशील. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी मौन घेऊन अंतःकरणामध्यें जपमाळ धरून निरंतर श्रीहरीचा जप करीत आहे. ॥ ४ ॥

२५

जाणीव नेणीव भगवंतीं नाही ं । हरि{उ}च्चारणी पाही मोक्ष सदा ॥ १ ॥

नारायण हरी उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥ २ ॥

तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीवजंतूंसीं केवीं कळे ॥ ३ ॥

ज्ञानदेव फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥ ४ ॥



भक्त ज्ञानी आहे किंवा अज्ञानी आहे हें भगवंत पहात नाहींत, तर त्यांच्या नामस्मरणानें दोघांनाही सारखीच मुक्ति मिळते. ॥ १ ॥ नारायणहरि या नामाचा उच्चार करणाराकडे कळिकाळाचा प्रवेश होत नाहीं. ॥ २ ॥ हरीच्या यथार्थस्वरूपाचा विचार वेदांनाही कळत नाही. मग तें स्वरूप सामान्य जीवांना कसें जळेल ? ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणानें सर्व मृत्युलोक वैकुंठ केल्याचें फळ मला मिळालें आहे ॥ ४ ॥

२४

जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥ १ ॥

न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामक्‍इश्ह्ण टाहो नित्य फोडी ॥ २ ॥

जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात । भजकां त्वरित भावनायुक्त ॥ ३ ॥

ज्ञानदेव ध्यानीं रामक्‍इश्ह्ण मनीं । वैकुंठभुवनीं घर केलें ॥ ४ ॥



जपतपादि कर्मे व अनेक नियमधर्म ज्या भावनेनें करतो त्या भावनेपेक्षां सर्व देहामध्यें एक आत्मारामालाच पाहणें ही भावना शुद्ध आहे. दुसरा अर्थ :- जप, तप, कर्म, क्रिया, नेम धर्म इत्यादि साधनें सर्व भूतांचे ठिकाणी अभिन्नत्वेंकरून परमात्मरूपाला पाहणें, या शुद्ध भावनेच्या पायावर उभारली गेली पाहिजेत. ॥ १ ॥ म्हणून अशा शुद्ध भावाचा त्याग करूं नको. या भावामध्यें बिघाड आणणाऱ्या सर्व संशयास फेकून दे, आणि रामकृष्ण नामाचा सारखा टाहो फोडीत रहा. दुसरा अर्थ :- अशा प्रकारचा शुद्ध भाव त्या साधनादिकेंकरून साध्य आहे, तरी त्या साधनानुष्ठानाचे भरात या साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये. सर्व संशय टाकून हा शुद्ध भाव वृद्धिंगत होण्याकरितां जीवानें रामकृष्णाचा निरंतर टाहो फोडला पाहिजे. ॥ २ ॥ जातीच्या, पैशाच्या, गोताच्या, कुळस्वभावादि गोष्टीच्या भानगडीत पडूं नको. शुद्ध भावनेनें युक्त होऊन त्वरेनें हरीला जप. दुसरा अर्थ :- या शुद्ध भावनेनें त्वरित युक्त होऊन जातीला, पैशाला व कुळगोत्रजाना तूं भज, म्हणजे जातीस, गोतास, कुळशीलास योग्य अशी कर्में कर, व द्रव्यार्जन, संगोपनादि व्यवहार मोठ्या दक्षतेनें कर म्हणजे अशा करण्यानें प्रापंचिक बाधा होणार नाही. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात मनात नेहमी रामकृष्णाची वस्ती आहे, त्यामुळें वैकुंठलोकीं माझें घर झालें आहे. दुसरा अर्थ :- श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचें घर वैकुंठभुवनांत झालें आहे, म्हणजे वैकुंठरूप हरीचें ठिकाणी आमची वस्ती झाली आहे ॥ ४ ॥

२३

सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वी कळा दावी हरी ॥ १ ॥

तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिश्ह्ठ । तेथें कांहीं कश्ह्ट न लागती ॥ २ ॥

अजपा जपणें उलट प्राणाचा । येथेंही मनाचा निर्धार असे ॥ ३ ॥

ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामक्‍इश्ह्णीं पंथ क्रमियेला ॥ ४ ॥



हा संसार कोणी सात तत्त्वामक आहे, कोणी पांच तत्त्वात्मक आहे, कोणी तीन तत्त्वात्मक आहे तर कोणी दहा तत्त्वात्मक आहे असें मानतात. दुसरा अर्थ : - सात अधिक पांच अधिक तीन अधिक दहा मिळून पंचवीस तत्त्वात्मक संसार मानतात. ही सर्व तत्त्वेंही हरि आपल्या एका चैतन्य तत्त्वावर दाखवतो. ॥ १ ॥ असा तत्त्वविचार करण्यापैकी हरीचें नाम नाही. ते सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. तें घेण्याला काही कष्ट पडत नाहीत. ॥ २ ॥ रात्री व दिवसां मिळून एकवीस हजार सहाशें वेळा सोहं सोहं असा आपले हृदयात प्राणाच्या वरती जाण्यांत आणि अपानाच्या खाली जाण्यात होणाऱ्या उभयतांचे भेटीत सहज जप होत असतो, त्यास अजपाजप म्हणतात. संकल्प सोडल्यास (म्हणजे २१३०० श्वास जे होतात त्यांमधून सोहं असा होणारा जप मी करतो असें म्हणून उदक सोडल्यास) साधकाचें मनाचा निश्चय असें करण्याकडे असतो. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणावांचून जगणें मला व्यर्थ वाटतें, म्हणून मी रामकृष्णाच्या भजनमार्गाचें क्रमण केलें आहे, म्हणजे निरंतर हरीचें भजन करीत आहे. ॥ ४ ॥